Marathi Poems

फुल

फुल जेव्हा फुललं
तेव्हा त्याला वाऱ्याने सुखावलं
पावसाने जगवलं
फुलपाखरू खेळलं त्याच्यासोबत
आणि सूर्यप्रकाशाने सांभाळलं

उन्मुक्त त्याच्या आयुष्यात
खूप काही कथा होत्या
आठवणी सजल्या
आणि कल्पना त्याला सुचल्या होत्या

पण हळू हळू त्याला वाटलं
हे सगळं व्यर्थ आहे
जगणं हे निरर्थक आहे

म्हणून त्याने शोध घेतला…

त्याला जाणवलं…
फांद्यांनी त्याला जपलंय
पानांनी त्याला सुखावलंय
आणि मुळांनी
घट्ट धरून ठेवलंय
कोणीतरी अद्भुत शक्ती
त्याच्या अस्तित्वातून
अर्थ घडवतेय

मग त्याला वाटलं
मनसोक्त जगायचं
अदृश्य पंखानी
भरारी घेऊन
सगळं विश्व व्यापायचं !!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *