नवीन नवीन लग्नं, फक्तं एक आठवडा झाला होता. एक आठवडा एकमेकांना ओळखण्यात आणि जवळ येण्यात गेले. अर्थातच हनिमून! घरी आल्यावर संसाराची मांडणी, जडणघडण सुरू झाली. आणि एके दिवशी बायको नवऱ्याला म्हणाली “हे वन बी एच के घर कुठे पुरणार आपल्याला. तुम्ही टू बी एच केच घ्यायला पाहिजे होतं. आपले नातेवाईक राहायला आले तर कुठे राहतील…” आणि नवरा धास्तावला… ‘वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी कर्ज न करता, कॅश वर हे घर मी घेतलं, हो बाबांची मदत होती पण मीही काही कमी मेहनत केली नाहीय.’ हा विचार मनात येऊनही त्याला अस्वस्थ वाटलं. ‘मी कुठे कमी पडलो का…’
आणि असं वरचेवर होत राहिलं.